
no images were found
जिल्ह्यात 24 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू
कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे या संदर्भात शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार असल्याबाबत जाहीर केले आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काही संघटनांकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या, धरणे, आंदोलन करण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.