
no images were found
सुमीत राघवनने साधला मनमोकळा संवाद
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया – नई पिढी नये किस्से‘मालिकेने विचार प्रवर्तक कथाकथनाची तीन वर्षे पूर्ण केली आहेत. मालिकेने सर्वसामान्य लोकांचे आयुष्य आणि त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांबद्दल रोचकपणे उलगडून सांगितले आहे. आजवरच्या प्रवासात मालिकेने विविधांगी भावभावनांसह स्तनांचा कर्करोग, मासिक पाळी, महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांसह सचोटीपणा, कौटुंबिक मूल्ये, सोलो डेटिंग आणि आपल्या आवडींची जोपासणा यांच्यासारख्या सौम्य मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला आहे.
मालिकेतील प्रमुख अभिनेते तथा राजेश वागले यांची भूमिका साकारणारे सुमीत राघवन यांनी या प्रभावशाली प्रवासाचा एक भाग बनल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले अनुभव मनमोकळेपणाने सांगितले. पडद्यावरील आपल्या राजेश या समर्पित कौटुंबिक व्यक्तीच्या पात्राप्रमाणेच सुमीत हे मालिकेतील संबंधित व्यक्तिरेखा आणि कथनकांसोबत एक नाते जोडून आहेत. मालिकेच्या तीन वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल त्यांचा दृष्टिकोनाची येथे एक झलक दाखवण्यात आली आहे.
‘वागले की दुनिया‘ने तीन वर्षे पूर्ण केली आहेत. तुमच्यानुसार मालिकेच्या या निरंतर यशाची गुरुकिल्ली काय आहे?
प्रेक्षक आणि वाहिनीच्या अतूट पाठबळासोबत ‘वागले की दुनिया‘ला मिळालेले हे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिपाक आहे. यासोबतच अभिनेते आणि लेखकांसह मालिकेशी जुळलेल्या प्रत्येकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे ही उपलब्धी गाठला आली आहे. ही मालिका कौटुंबिक नात्यांचे महत्त्व, वडिलधाऱ्या व्यक्तींची भूमिका, शेजारांसोबत स्थापन झालेले सलोख्याचे संबंध अशा प्रमुख भारतीय मूल्यावर आधारित आहे जी आजच्या संदर्भात अधिक गहिरेपणाने तादात्म्य साधतात. इतकेच नव्हे तर सामाजिक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकणे आणि प्रभावशाली कथाकथनाची मालिकेची वचनबद्धता प्रेक्षकांसोबत मालिकेचे नाते अधिकच गहिरे करते. यातून मालिकेतील व्यक्तिरेखा आणि कथेसोबत अधिकच जवळचे नाते त्यांना अनुभवास येते.
मालिकेसोबत तुमच्या आजवरच्या प्रवासावर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता का? दूरचित्रवाणीच्या जगात ही मालिका इतरांपेक्षा कशामुळे वेगळी आहे, याबद्दल तुमचे मत काय आहे?
मी सोनी सबवरील ‘वागले की दुनिया‘ मालिकेचा प्रदीर्घ काळापासून एक भाग राहिलेलो आहे. मालिकेसोबतचा आजवरचा माझा प्रवास हा अविश्वसनीयरीत्या समाधान आणि आनंद देणारा राहिला आहे, विशेषकरून मालिका आपला तीन वर्षांचा प्रवास पूर्ण करत असताना! खरे पाहिले तर इतरांपेक्षा ‘वागले की दुनिया‘ मालिकेला आगळी ठरवणारी गोष्ट म्हणजे प्रासंगिक आणि आशयगर्भ कथांच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यांना संबोधित करण्याचा तिचा अनोखा दृष्टिकोन आहे. केवळ ऐपिसोड्सच्या संख्येचाच नव्हे तर प्रभावशाली आणि खिळवून ठेवणाऱ्या आशयाच्या जोरावर मालिकेने एक मापदंड स्थापन केला आहे.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणे आणि त्यांचे मनोरंजनही करत सामजिक मुद्द्यांना हात घालण्यात मालिकेने कशा प्रकारे यशस्वी समतोल साधला आहे?
ही मालिका महत्त्वाच्या विषयांवर प्रकाशझोत टाकते अन् सोबतच प्रेक्षकही खिळून राहतील, याची निश्चिंती करते. प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेणाऱ्या आशयगर्भ कथा सांगत प्रभावशाली आणि मनोरंजक आशय तयार करणे हे मालिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही मालिका विविध प्रकारच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच विचार प्रवर्तक संवादांत समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहे.