
no images were found
शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत- अनिल परब
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत निर्णय दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी आम्हाला अपात्र का केलं नाही? सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईंच्या याचिकेवर जे निर्देश दिले होते त्यावरुन आम्हाला वाटत होतं की एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होतील असं वाटलं होतं. मात्र आता राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्यामुळे ती भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती असं आम्हाला वाटतं आहे असं अनिल परब म्हणाले. इतकंच नाही तर शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत असाही दावा त्यांनी केला.
शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे आज जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असं अनिल परब यांनी म्हटलं. महाराष्ट्रातल्या लहान मुलांना विचारा शिवसेना कुणाची ते उत्तर देतील असंही अनिल परब म्हणाले. माझ्याकडे जे फुटले त्यांची यादी आहे. त्या ४० आमदारांपैकी २५ जणांनी बाळासाहेब ठाकरेंना बघितलेलंही नाही.