Home सामाजिक ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

40 second read
0
0
38

no images were found

दिलखुलासजय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

 

            मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात मध महोत्सव 2024‘ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी व युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘मध केंद्र योजना’ राबविण्यात येत आहे. याचबरोबर उद्योगाचे स्थैर्यस्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणेतयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरसभागृह येथे देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकशेतकरी व तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावाअसे आवाहन मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून केले आहे.

            दिलखुलास‘ कार्यक्रमात सभापती श्री. साठे यांची मुलाखत सोमवार दि. 15 आणि मंगळवार दि. 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवारदि. 16 जानेवारी2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…