
no images were found
पावनगडावरील अतिक्रमण हटवल्याविषयी अभिनंदन; अशीच कारवाई विशाळगडावरील अतिक्रमणावर लवकर व्हावी !
कोल्हापूर (प्रतिनिधी): प्रशासनाने पावनगडावरील हटवले त्याविषयी अभिनंदन ! शासनाने यापूर्वी प्रतापगड, संग्रामगडावरील अतिक्रमण काढले, नुकतेच माहिमगड येथील अतिक्रमण हटवले आहे. महाराष्ट्रात अजूनही ३०-३५ गडांवर अतिक्रमण असून ते अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया जलदगतीने होणे अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात ठोस कृती होत नसून प्रारंभी पावसाळा असल्याने अतिक्रमण हटवले न जाणे आणि आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते न काढले जाणे यांमुळे ते निघालेले नाही. तरी सरकारने विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता देणे यांसह ज्या ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या तात्काळ कराव्यात !