Home राजकीय भाजप ८० च्या दशकातील जुनाच फॉर्म्युला वापरणार !

भाजप ८० च्या दशकातील जुनाच फॉर्म्युला वापरणार !

0 second read
0
0
41

no images were found

भाजप ८० च्या दशकातील जुनाच फॉर्म्युला वापरणार !

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेसाठी ‘मिशन ४८’ तर विधानसभेसाठी ‘२०० प्लस’ मोहीम भाजपा राबवणार आहे. यातच विधानसभेच्या २०२४ मध्ये होत असलेल्या निवडणुकांतील विजयासाठी भाजपनं आपला ८० च्या दशकातील जुनाच फॉर्म्युला वापरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 2014मध्ये तर धनगर, माळी आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अथक प्रयत्न केले होते. निवडणुकीत भाजपला त्याचा फायदाही झाला होता. भाजपने रासप नेते महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं. जानकर हे धनगर समाजातील नेते आहेत. 2014मध्ये भाजपने माळी, धनगर आणि वंजारी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. मात्र, सत्ता येताच भाजपमध्ये मराठा नेत्यांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केली आणि पक्षात मराठा समाजाला अधिक महत्त्व मिळालं. त्यामुळे माळी, धनगर आणि वंजारी समाज मागे पडला होता.

सुरुवातीच्या काळात भाजप हा पक्ष विशिष्ट जातीपूरता मर्यादित होता. त्यामुळे भाजप नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलण्यासाठी अथक प्रयत्न केले. वसंतराव भागवत यांनीच भाजपचा चेहरा बदलण्यासाठी माधव फॉर्म्युला आणला. त्यासाठी त्यांना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर आणि महादेव शिवणकर यांच्यासह इतर नेत्यांची साथ लाभली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…     जागतिक पर्यावरण …