
no images were found
‘भ्रष्टाचार मुक्त पुणे‘संकल्पासाठी बसपाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
मुंबई/ पुणे : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता मुक्त भारताच्या संकल्प कधी केला नाही. भाजप सत्तेवर आली तर कॉंग्रेसमुक्तीचा, तर कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर सांप्रदायिक द्वेष,आरएसएस मुक्त भारताचा संकल्प करते.स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कुठल्याही पक्षाने अस्पृश्यता, जातीय भेदभाव, गरीबी, बेरोजगारी, दलित महिला अत्याचार मुक्तीची साधी चर्चा देखील केली नाही. पंरतु, सर्वजनाच्या हितासाठी आणि सर्वजनाच्या सुखासाठी केवळ बसपाच पक्ष स्थापनेपासून प्रयत्नरत्न आहे,असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब यांनी शुक्रवारी केले. बसपा पुणे जिल्ह्याच्यावतीने येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित ‘भ्रष्टाचार मुक्त पुणे’संकल्पासाठी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याला डॉ.सिद्धार्थ यांनी संबोधित केले. यावेळी विचारपीठावर प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब, प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब तसेच प्रदेश प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी साहेब उपस्थित होते.