Home राजकीय आ. हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; कार्यकर्ते, शेतकरी संतप्त

आ. हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; कार्यकर्ते, शेतकरी संतप्त

3 second read
0
0
92

no images were found

आ. हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; कार्यकर्ते, शेतकरी संतप्त  

कोल्हापूर : सन २०१२ ते आजअखेर हा गुन्हा घडल्याची फिर्याद दिली आहे. आ. हसन मुश्रीफ यांनी २०१२ मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले व सुमारे ४० कोटींची फसवणूक केल्याची तक्रार  विवेक कुलकर्णी यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात आ. हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे मुरगूड पोलिसांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, तसेच काही शेतकरी मुरगूड पोलिस ठाण्याकडे आले. चुकीची व बिनबुडाची तक्रार शहानिशा न करता कशी दाखल करून घेतली, त्यासाठी कोणती कागदपत्रे पुरवण्यात आली, असा जाब सहायक निरीक्षक बडवे यांना विचारला.

कुलकर्णीं यांच्यासह अन्य सभासदांना महिन्याला पाच किलो साखर, तसेच लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविण्यात आली. कारखाना सुरू झाल्यावर साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक या सदराखाली देण्यात आले. विवेक कुलकर्णी व साक्षीदार यांना कोणतीही पावती, शेअर सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एलएलपी’ या नावाने पोच पावत्या देण्यात आल्या. ‘नॉन क्युम्युलेटी व प्रेफरेंशियल शेअर्स’ या सदराखाली या पोच पावत्या दिल्याचे दिसून आले. कारखाना उभा करताना रोख, धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागलमधील शाखा क्रमांक एक व दोनमधून त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड (नियोजित)च्या नावाने आमच्याकडे भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

  यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. संतप्त कार्यकर्त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात हुकूमशाही सुरू झाल्याचा आरोप केला. आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात एक व्यक्ती ४० कोटींची तक्रार करते आणि त्याची शहानिशा न करता गुन्हा दाखल कसा करून घेतात, सर्व ४० हजार शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे काय? १० ते १५ जण येऊन ४० हजार शेतकऱ्यांची तक्रार कशी देऊ शकतात, असा जाब यावेळी विचारण्यात आला. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…