
no images were found
शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 साईभक्तांचा मृत्यू, अनेकजण जखमी
नाशिक : येथील सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. एकाच दुर्घटनेत गावातील तब्बल १० जणांनी आपला जीव गमावल्याने मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री तब्ब १५ बसेसमधून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसला पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले.
अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जात असून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली.दरम्यान, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे