
no images were found
चांदोली धरणातून 3000 क्यूसेक’ने पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शितूर: मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे चांदोली धरणात २८.७८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, दुपारी तीन वाजता वाजता पाटबंधारे विभागाचे विभागाचे उपविभागीय अभियंता किटवडकर, शाखाधिकारी गोरख पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पाणीपूजन करून धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटर ने उचलून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.