दिव्यांगांच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा – प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल कोल्हापूर, : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन सुसह्य करावे, असे आवाहन कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिराचे आयोजन उच्च न्यायालयाच्या बालन्याय समिती, महाराष्ट्र राज्य विधी …