संवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामत कोल्हापूर, : संवाद आणि जनजागृती या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांचे मुख्य प्रवाहात समावेशन करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले. शिवाजी विद्यापीठात आज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, कोल्हापूर आणि विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीय कल्याण, हक्क व संरक्षण कायदा …