Home Uncategorized न्याय विभागाच्या खटल्यापासून विकसित भारतापर्यंत: गौतम अदाणी यांनी विश्वास, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीवर आपले विचार व्यक्त केले

न्याय विभागाच्या खटल्यापासून विकसित भारतापर्यंत: गौतम अदाणी यांनी विश्वास, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीवर आपले विचार व्यक्त केले

34 second read
0
0
7

no images were found

न्याय विभागाच्या खटल्यापासून विकसित भारतापर्यंत: गौतम अदाणी यांनी विश्वास, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीवर आपले विचार व्यक्त केले

अहमदाबाद, : भारत आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी ‘अपनी बात, अपनों के साथ’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात विश्वास, मजबूत संस्था उभारणे, संकटातून मिळणारे धडे आणि भारताचे भविष्य घडवण्याची प्रत्येक पिढीची जबाबदारी यावर आपले विचार मांडले.

10 ऑगस्ट 2026 रोजी न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टमधील अमेरिकन जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधातील अमेरिकन न्याय विभागाचा (DoJ) फौजदारी खटला फेटाळल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हे भाषण केले. मात्र, त्यांनी केवळ कायदेशीर निर्णयावर भाष्य न करता, अदाणी समूहाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या काळात मार्गदर्शक ठरलेल्या मूल्यांवर भर दिला. हिंडेनबर्ग रिसर्चचे आरोप आणि त्यानंतरचा न्याय विभागाने दाखल केलेला खटला आठवताना गौतम अदाणी म्हणाले की, या संपूर्ण अनुभवामुळे त्यांचा कायद्याच्या राज्यावरील विश्वास अधिक मजबूत झाला, नम्रता वाढली आणि समूहाच्या अनेक दशकांच्या प्रवासाला दिशा देणाऱ्या एका विचारावर पुन्हा विश्वास बसला. दिलेली वचने पाळणे, आपल्या मूल्यांशी ठाम राहणे आणि कठीण काळातही योग्य तेच करणे यामुळेच दीर्घकाळ टिकणारा विश्वास मिळतो, असे त्यांनी सांगितले.

700 हून अधिक ठिकाणी कार्यरत असलेल्या आणि 3 लाखांहून अधिक कर्मचारी व भागीदारांचा समावेश असलेल्या ‘अदाणी परिवाराला’ संबोधित करताना गौतम अदाणी म्हणाले की, स्वातंत्र्यदिन हा केवळ भारताच्या यशाचा उत्सव नाही, तर आजची पिढी पुढील पिढीसाठी कोणता वारसा ठेवणार आहे, याचा विचार करण्याचीही संधी आहे. भारत ‘विकसित भारत’ होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, त्यांनी प्रत्येक कर्मचारी आणि भागीदाराला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारण्याचे आवाहन केले: “आपली पिढी कोणत्या कामासाठी आणि कोणत्या योगदानासाठी लक्षात ठेवली जाईल?”

हे भाषण ‘अपनी बात, अपनों के साथ’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात झालेल्या संवादावर आधारित होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त झालेल्या या पहिल्या कार्यक्रमात गौतम अदाणी यांनी श्रमाचे महत्त्व आणि प्रत्येक संस्थेच्या प्रगतीत लोकांची महत्त्वाची भूमिका यावर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी नेतृत्व घडवणारी, संस्थांना मजबूत करणारी आणि पिढ्यान्‌पिढ्या टिकणारी मूल्ये यावर अधिक सविस्तर चर्चा केली.

गौतम अदाणी यांच्या मते, ही मूल्ये सर्वप्रथम घरातूनच शिकायला मिळाली. प्रामाणिकपणा, नम्रता आणि दिलेले वचन पाळणे ही त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाची आधारभूत तत्त्वे बनली. त्यांच्या वडिलांचा “दिलेला शब्द नेहमी पाळला पाहिजे” हा विचार आणि आईने त्याग व माणुसकीचे दिलेले शांत उदाहरण आजही त्यांना मार्गदर्शन करते.

तरुणवयात संधीच्या शोधात घर सोडल्याने त्यांना असे अनेक धडे मिळाले, जे कोणत्याही वर्गात शिकता आले नसते. त्यांनी सांगितले की, माणसाचा स्वभाव हा न घडवलेल्या हिऱ्यासारखा असतो. चिकाटी, अनुभव आणि संकटांचा सामना केल्यानंतरच त्याचे खरे तेज समोर येते. आपली कहाणी ही अदाणी परिवारातील असंख्य सदस्यांच्या कहाणीशीही मिळतीजुळती आहे, असे ते म्हणाले. अनेकांनी संधीच्या शोधात घरची ओळखीची सुरक्षितता मागे सोडली, देशाच्या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कुटुंबासाठी चांगले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहिले.

संकटाच्या काळात खरे चरित्र समोर येते

समुद्रमंथनाच्या कथेचे उदाहरण देत गौतम अदाणी यांनी सांगितले की, संकटामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा स्वभाव बदलत नाही, तर संकटाच्या काळात त्याचे खरे चरित्र समोर येते. हिंडेनबर्गचे आरोप आणि त्यानंतरची अमेरिकेतील DoJ ची कायदेशीर प्रक्रिया ही अदाणी समूहासाठी अशीच एक मोठी परीक्षा होती. या काळात समूहाने आपली मूलभूत मूल्ये बदलली नाहीत. उलट, संयम ठेवणे, कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आणि मोठ्या सार्वजनिक दबावातही आपल्या भूमिकेवर ठाम राहणे किती महत्त्वाचे आहे, हे अधिक स्पष्ट झाले.

याच विचाराचे सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणून त्यांनी समूहाने 20,000 कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) मागे घेण्याचा निर्णय सांगितला. कायद्यानुसार ही ऑफर पुढे नेण्याचा अधिकार असतानाही समूहाने ती मागे घेतली. गौतम अदाणी म्हणाले, “विश्वास हा कोणत्याही कायदेशीर अधिकारापेक्षा मोठा असतो.” कायदे आपल्याला अधिकार देतात, पण ते अधिकार कधी वापरायचे हे आपली मूल्ये ठरवतात.

अदाणी समूहासाठी यश म्हणजे केवळ उभारलेल्या पायाभूत सुविधा नाहीत. कर्मचारी, गुंतवणूकदार, कर्जदार, भागीदार आणि समाजाचा मिळवलेला विश्वास आणि विश्वासार्हता हीसुद्धा यशाची महत्त्वाची मापदंड आहेत. हा विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. दररोज दिलेले वचन पाळण्याच्या शिस्तीतून तो हळूहळू तयार होतो, असे गौतम अदाणी यांनी सांगितले.

कृतीतून ठाम विश्वास

अमेरिकेतील कायदेशीर प्रक्रियेदरम्यान अदाणी समूहाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवले, न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला आणि दिलेली वचने पूर्ण करण्याचे काम सुरू ठेवले, असे गौतम अदाणी यांनी सांगितले.

समूहाच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या काळातही कंपनीने व्यवसायातील मजबूत कामगिरी नोंदवली, महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प पुढे नेले आणि विविध क्षेत्रांमध्ये आपली स्थिती अधिक मजबूत केली.

या काळात ‘अदाणी परिवाराची’ खरी ताकदही समोर आली. सार्वजनिक चर्चेचे लक्ष कायदेशीर प्रकरणावर असताना कर्मचारी, कामगार, पुरवठादार, कंत्राटदार, विक्रेते आणि भागीदार यांनी शांतपणे आपले काम सुरू ठेवले. त्यांनी व्यवसाय उभारणे, ग्राहकांना सेवा देणे आणि आपली आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे काम सुरूच ठेवले. त्यांच्या याअढळ मेहनती आणि समर्पणामुळे समूहाच्या सर्वात कठीण काळातील एक अध्याय त्याच्या मजबूत विकासाच्या काळात बदलला, असे गौतम अदाणी यांनी सांगितले.

गौतम अदाणी यांनी सांगितले की, या संपूर्ण अनुभवामुळे मानवतेवरील त्यांचा विश्वास आणखी मजबूत झाला. देशभरातील अनेक अनोळखी लोकांनी त्यांना प्रोत्साहनाचे शब्द, प्रार्थना आणि शांतपणे पाठिंबा दिला. समूहावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या लोकांचेही त्यांनी आभार मानले. टीकेमागचा हेतू काहीही असो, टीका आपल्याला आत्मपरीक्षण करून सुधारण्याची संधी देते, असे त्यांनी सांगितले.

अदाणी समूहाच्या यशामागे काम करणाऱ्या लोकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रत्येक यशामागे मेहनत करणाऱ्या लोकांचे योगदान असते आणि त्यांच्या समर्पणामुळेच प्रत्येक यशाला खरा अर्थ मिळतो, असे ते म्हणाले. खावडा रिन्यूएबल एनर्जी पार्कमध्ये काम करणाऱ्या अमित कुमार या तरुण अभियंत्यासोबत झालेल्या संवादाची आठवण सांगताना गौतम अदाणी म्हणाले की, या संवादामुळे त्यांचा हा विश्वास अधिक दृढ झाला की विकास म्हणजे केवळ जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उभारणे नव्हे. विकासामुळे निर्माण होणारी आशा, लोकांना मिळणारा सन्मान आणि त्यांच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल हेही तितकेच महत्त्वाचे आहेत.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगताना गौतम अदाणी म्हणाले की, हा दिवस देशाने केलेल्या प्रगतीचा आनंद साजरा करण्याचा प्रसंग आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक पिढीवर असलेल्या जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस देखील आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाकडे पाहताना ते म्हणाले की, इतिहास भारताने उभारलेल्या पायाभूत सुविधांबरोबरच देशाने निर्माण केलेल्या संधी, मजबूत केलेली समाजव्यवस्था आणि लोकांमध्ये निर्माण केलेली आशा यांचीही नोंद घेईल.

शेवटी त्यांनी अदाणी परिवारातील प्रत्येक सदस्याला आणि भागीदाराला गेल्या दोन वर्षांत मिळालेले धडे नम्रता, प्रामाणिकपणा आणि नव्या उद्देशाने पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, पुढचे काम केवळ जागतिक दर्जाचे व्यवसाय उभारणे एवढेच नाही, तर व्यक्तींपेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या संस्था उभारणे, अधिकाधिक संधी निर्माण करणे आणि अधिक मजबूत व आत्मनिर्भर भारत घडवण्यास मदत करणे हे आहे. मूल्यांवर आधारित आणि समाजसेवेसाठी समर्पित अशा संस्था ‘विकसित भारता’चे सामायिक स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना

डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना शहरातील विविध भागांत …