no images were found
पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पा आपल्या तत्त्वांपेक्षा घराला प्राधान्य देईल का?
सोनी सब वरील पुष्पा इम्पॉसिबल आपल्या भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवत आहे. पुष्पा (करुणा पांडे) पुन्हा एकदा आयुष्य बदलून टाकणाऱ्या आव्हानाला सामोरी जात आहे. नुकत्याच झालेल्या संकटातून सावरत असतानाच एक धक्कादायक सत्य तिच्या कुटुंबाच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून नेण्याची वेळ आणते आणि त्यांच्या भविष्याला मोठा धोका निर्माण करते.
आगामी भागांमध्ये पुष्पाला समजते की दिलीप (जयेश मोरे) ने तिचे घर तिच्या नकळत गहाण ठेवले आहे आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब सर्व काही गमावण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. बँकेचे अधिकारी घर रिकामे करण्याचा अल्टिमेटम देतात आणि संपूर्ण चाळ स्तब्ध होते. अपराधीपणाने ग्रासलेला दिलीप चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो, तर पुष्पाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कठोर वास्तवता स्वीकारावी लागते. या संकटात बापोदरा आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवतो, पण अट घालतो की पुष्पाने चिरागला मनवाशी (रसिका धोंडले) लग्न करण्यास तयार करावे आणि शनाया (मुस्कान बामने) ला चाळ सोडायला लावावे. अशा परिस्थितीत घर वाचवण्यासाठी तिने आपले तत्त्व सोडावे का, की योग्य गोष्टीसाठी सर्व काही गमावण्याचा धोका पत्करावा, हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो.
पुष्पा तिचं घर वाचवण्यासाठी आपले तत्त्वांशी तडजोड करेल का, की योग्य गोष्टींसाठी उभी राहून सर्व काही गमावण्याचा धोका पत्करेल?
आगामी ट्रॅकबद्दल बोलताना, करुणा पांडे म्हणाल्या, “मला वाटतं प्रत्येकजण घर म्हणजे काय याच्याशी जोडला जातो. पुष्पासाठी घर हे फक्त राहण्याचे ठिकाण नाही, तर तिच्या कुटुंबाचे सुरक्षित स्थान आहे, जिथे तिने अनेक संघर्षांवर मात करून असंख्य आठवणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे हे सर्व गमावण्याची वेळ येणे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे. पण या प्रवासाला आणखी भावनिक बनवणारी गोष्ट म्हणजे या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग अटींसह येतो – चिराग आणि मनवाचे लग्न लावणे – जे पुष्पाच्या तत्त्वांशी पूर्णपणे विरोधात आहे. पुष्पा नेहमीच योग्य मार्ग निवडते, जरी तो कठीण असला तरी. हाच तिचा सर्वात मोठा गुण आहे. हा ट्रॅक तिच्या मूल्यांना अंतिम कसोटीवर नेतो आणि मला खात्री आहे की प्रेक्षक उत्सुकतेने पाहतील की तिच्या मन आणि परिस्थितीमध्ये तिने काय निवडले.”