Home Uncategorized भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रेनिमित्त विद्यापीठात हवामान जनजागृती कार्यशाळा

भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रेनिमित्त विद्यापीठात हवामान जनजागृती कार्यशाळा

3 second read
0
0
9

no images were found

भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रेनिमित्त विद्यापीठात हवामान जनजागृती कार्यशाळा
कोल्हापूर,  : शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इश्रे) आणि युआन यांच्या संयुक्त विद्यमाने “भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रा”अंतर्गत येत्या गुरूवारी (दि. ९) दुपारी २.३० वाजता राजर्षी शाहू सभागृहात हवामान जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेसाठी प्रा. चेतन सिंह सोलंकी, सोलर मॅन ऑफ इंडिया तथा फाउंडर, एनर्जी स्वराज हे प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. हवामान बदल, शाश्वत जीवनशैली, ऊर्जा स्वावलंबन आणि स्वेच्छेने हवामान कृती (Voluntary Climate Action) या विषयांवर सोलंकी मार्गदर्शन करणार आहेत. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी असतील. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित असतील.
सध्या जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळेसाठी विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी केले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबल भारताला प्रेरणा देत आहे कारण खरी ताकद ही मूल्ये आणि प्रामाणिकपणात असते हे दाखवत आहे

पुष्पा इम्पॉसिबल भारताला प्रेरणा देत आहे कारण खरी ताकद ही मूल्ये आणि प्रामाणिकपणात असते हे…