Home मनोरंजन   ‘इत्ती सी खुशी’ मध्ये  “सुम्बुल तौकीर खानने उघड केले की पडद्यावर चिडियाला मार्गदर्शन करणे म्हणजे जणू ती आपल्या खऱ्या आयुष्यातील बहिण सानियाला सल्ला देत आहे.

  ‘इत्ती सी खुशी’ मध्ये  “सुम्बुल तौकीर खानने उघड केले की पडद्यावर चिडियाला मार्गदर्शन करणे म्हणजे जणू ती आपल्या खऱ्या आयुष्यातील बहिण सानियाला सल्ला देत आहे.

6 second read
0
0
16

no images were found

  ‘इत्ती सी खुशी’ मध्ये  “सुम्बुल तौकीर खानने उघड केले की पडद्यावर चिडियाला मार्गदर्शन करणे म्हणजे जणू ती आपल्या खऱ्या आयुष्यातील बहिण सानियाला सल्ला देत आहे.

सोनी सबवरील इत्ती सी खुशी हा शो प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे, अन्विता (सुम्बुल तौकीर खान) हिच्या प्रवासातून, जी आपल्या भावंडांची जबाबदारी सांभाळते. शोमध्ये योग्य-अयोग्य यातील संघर्ष आणि खोताचिवाडीमध्ये सुरू असलेल्या रहस्यमय चोरीच्या घटनांमुळे वाढत जाणारी दरी दाखवली जात आहे. या सगळ्यात अन्विता आणि तिची धाकटी बहीण चिडिया (आयेशा विंधारा) यांचं नातं कथानकाचं केंद्रबिंदू बनलं आहे.

      सध्याच्या ट्रॅकमध्ये चिडिया सोशल मीडिया इन्फ्लुएंसर के लव्हच्या ग्लॅमरस जगाकडे आकर्षित होते. तिचे मित्र, जे के लव्हला फॉलो करतात, तिला सांगतात की त्यांच्या गटाचा भाग व्हायचं असेल तर इन्फ्लुएंसरने दिलेले चॅलेंज पूर्ण करावे लागतील. गटात सामील होण्याच्या उत्साहात चिडिया हे चॅलेंज स्वीकारते आणि हळूहळू तिच्यात बदल दिसू लागतात. हे बदल पाहून तिची मोठी बहीण अन्विता चिंतित होते. अन्विता तिला प्रेमाने आणि संयमाने योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अन्विता साकारताना सुम्बुल तौकीर खान यांनी सांगितले की हे दृश्य त्यांच्यासाठी खूप वैयक्तिक होते, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या बहिणी सानियासोबत झालेल्या संवादांची आठवण झाली.

     अनुभवाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना, सुम्बुल तौकीर खान म्हणाल्या, “हा ट्रॅक माझ्यासाठी खूप खास आहे कारण तो अगदी वास्तवाशी जुळतो. जेव्हा अन्विता चिडियाला बसवून समजावते की काय योग्य आहे आणि काय कदाचित तिच्यासाठी चांगलं नसेल, तेव्हा मला अजिबात वाटत नाही की मी अभिनय करते आहे. खरंच असं वाटतं की मी माझ्या स्वतःच्या बहिणी सानियाशी बोलते आहे. मी प्रत्यक्ष आयुष्यात तिच्याबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि ती जेव्हा गोंधळलेली किंवा उदास असते, तेव्हा मी आपोआप ‘मोठ्या बहिणीच्या मोड’ मध्ये जाते. त्यामुळे जेव्हा अन्विता चिडियाला शांतपणे समजावते, तेव्हा ते माझ्यासाठी अगदी नैसर्गिक होतं. आयुष्यात अनेकदा मी तिच्याशी मित्रांबद्दल, इन्फ्लुएंसेसबद्दल आणि त्या निर्णयांबद्दल बोलले आहे जे त्या क्षणी रोमांचक वाटतात पण नेहमी योग्य नसतात. ही संरक्षक वृत्ती माझ्यात नैसर्गिक आहे. मला वाटतं की हे खरं नातं पडद्यावरही दिसतं आणि त्यांचं नातं खास बनवतं.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…