Home शासकीय जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

22 second read
0
0
40

no images were found

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

• २१ डिसेंबर रोजी मतमोजणी
• राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन

                                                                कोल्हापूर, : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सहआयुक्त नगरप्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमधील निवडणुका ३१८ मतदान केंद्रांवर पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित १३ नगरपालिका  ठिकाणी होणार आहे. या कामासाठी एकूण ७९० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे. मतमोजणीसाठी एकुण टेबल व कंसात मतमोजणी फेऱ्या पुढिल प्रमाणे – जयसिंगपूर १३ (५), मुरगूड ६(२), मलकापूर ५(२), वडगाव १०(३), गडहिंग्लज ११(४), कागल ६(७), पन्हाळा ५(२), कुरुंदवाड १०(३), हुपरी ५(७), शिरोळ ११(३), आजरा १०(२), चंदगड ९(२) आणि हातकणंगले ७(३).

फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गडहिंग्लज येथील प्रभाग क्रमांक ३ अ येथे निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी २४७९ मतदारांसाठी ३ मतदान केंद्रांवर मतदान होईल.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख नियोजनासह संबंधित राजकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती बैठकीतून देण्याच्या सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, निकालानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांबाबत कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे अमलात आणावी. कुठेही मिरवणुका, रॅली निघणार नाहीत याची दक्षता घ्या. सर्व ईव्हीएमची सुरक्षितता, सुरक्षा आणि स्ट्राँग रूमबाबत आवश्यक काळजी घ्यावी.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व १३ स्ट्राँग रूम ठिकाणी सशस्त्र एसआरपीएफचे १ जवान तसेच ३ आर्मगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी ८ पोलीस उपविभागीय अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४६३ पोलीस अंमलदार आणि ८०० होमगार्ड नेमण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन

पार पडलेल्या १३ ठिकाणच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात एकूण ७८.८७ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये मुरगूड – ८८.४३%, मलकापूर – ८६.९९%, आणि वडगाव – ८६.२४% या नगरपरिषदा राज्यात मतदान टक्केवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत. या अनुषंगाने मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीत केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …