
no images were found
रब्बी पिकांचा MSP वाढवला, शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी केंद्र सरकारची भेट
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजे एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ठाकूर म्हणाले की, मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये ११० रुपये, बार्ली १०० रुपये, हरभरा १०५ रुपये, मसूर ५० रुपये, मोहरी ४०० रुपयांनी आणि करडईमध्ये २०९ रुपयांची वाढ केली आहे.
या वाढीनंतर आता गव्हाच्या एमएसपीमध्ये २१२५ रुपये प्रति क्विंटल, बार्लीच्या एमएसपीमध्ये १७३५ रुपये प्रति क्विंटल, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये ५३३५ रुपये प्रति क्विंटल, मसूरच्या एमएसपीमध्ये ६,००० रुपये प्रति क्विंटल, मोहरीच्या एमएसपीमध्ये ५४५० रुपयांची आणि एमएसपीमध्ये ५४५० रुपयांची वाढ झाली आहे. करडईचे भाव ५६५० रुपये प्रति क्विंटल झाले.
२०२३-२४ च्या पणन सत्रासाठी सर्व रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळाने मसूरच्या कमाल एमएसपीमध्ये वाढ केली असून मसूरचा एमएसपी प्रति क्विंटल ५०० रुपयांनी वाढवून ६,००० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.