Home मनोरंजन ‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ मालिकेत एका वर्षाचे स्थित्यंतर तर पश्मिनाचा विवाह ऋषीसोबत होणार

‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ मालिकेत एका वर्षाचे स्थित्यंतर तर पश्मिनाचा विवाह ऋषीसोबत होणार

6 second read
0
0
29

no images were found

‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ मालिकेत एका वर्षाचे स्थित्यंतर तर पश्मिनाचा विवाह ऋषीसोबत होणार

 

काश्मीरच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर घडणारी सोनी सबवरील ‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ ही मालिका एक युगुल – राघव (निशांत मलकानी) आणि पश्मिना (ईशा शर्मा) यांची प्रेमकथा उलगडून सांगते. एकत्र येण्याच्या प्रवासात या जोडीला अनेक अडथळे आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. मालिकेत आता एका वर्षाचे स्थित्यंतर घडून येत आहे. यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीत नवी कलाटणी आणि वळण मिळेल, हे मात्र नक्कीच.मालिकेतील अलीकडच्या भागांत आपण पाहिले की, पश्मिना आणि राघव एकत्रित येण्याला एक दु:खद वळण लागते. पश्मिनाकडे आपल्या प्रेमाची कबुली देत असताना राघव अचानक रेलिंगवरून कोसळतो. यामुळे त्याच्या शरीराचा खालचा भाग अर्धांगवायूग्रस्त होतो. मालिकेतील स्थित्यंतराच्या पश्चात पश्मिना आपली आई प्रीतीसोबत (गौरी प्रधान) काश्मिरात परत येते. प्रेक्षकांना एक धक्कादायक कलाटणी पाहायला मिळते जेव्हा पश्मिनाचा एक नवीन व्यक्ती – ऋषीसोबत (लीनेश मट्टू) सारखपुडा पार पडतो. पश्मिना आपल्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याच्या बेतात असताना दुसरीकडे राघव आजारातून बरा होऊन पश्मिनासोबत एकत्र येण्यासाठी काश्मिरात परततो. घटनांत आश्चर्यकारक वळण लागत असताना कथानकात नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश ‘पश्मिना -धागे मोहब्बत के’ मालिकेतील नवा टप्पा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, यात शंकाच नाही.

मालिकेत पश्मिनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा शर्मा म्हणाली की, “पश्मिनाचे खरे तर राघववर प्रेम असते. मात्र त्याच्या कुटुंबाकडून सातत्याने नकार येतो. तिच्या आईने काश्मीरात परतण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे ती राजी होते. राघवप्रती मनात भावना असल्या तरी पश्मिना ऋषीसोबत संसार थाटण्याचा आव्हानात्मक निर्णय घेते. तो एक काळजी घेणारा मित्र असून पश्मिनाच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. राघवसोबतच्या प्रेमकथेला फारसे काही भवितव्य नसल्याच्या वास्तविकतेचा स्वीकार करत मालिकेतील कथानक एक रोमांचक स्थित्यंतर घडते.”  

मालिकेत ऋषीची भूमिका निभावणारा अभिनेता लीनेश मट्टू म्हणाला की, “एका वळणावर ऋषी पश्मिनाच्या आयुष्यात प्रवेश करतो. यातून त्याचा पश्मिनावर खुराखुरा जीव जडतो. पश्मिनाच्या मनात राघवविषयी भावना असल्याचे माहित असतानाही ती त्याच्या प्रेमाची अदलाबदल करणार नाही, हे वास्तव आहे. तरीही त्याला तिच्याशीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे. कारण त्याचे प्रेम पश्मिनाच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मक बदल घडवून आणेल, असा ऋषीला विश्वास आहे. आव्हानांचा सामना करत असतानाही ऋषीचे एकतर्फी प्रेम त्यांच्या आयुष्यात एक आगळाच आयाम जोडतो. राघव काश्मिरात परत आल्यामुळे मालिकेत आता गुंतागुंतीचा प्रेम त्रिकोण निर्माण झाला आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…