
no images were found
ब्लॅक पॅंथर च्या वतीने विनय कदमांचा सत्कार
कोल्हापूर (प्रतनिधी): ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने मा विनय कदम साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिव पदी निवड झाले बद्दल पुष्पहार देऊन पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्काराच्या वेळी बोलताना विनय कदम म्हणाले की,स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ,स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा मी पाईक आहे. शाहू,फुले, आंबेडकर यांचा विचारांचा मी पहिल्यापासूनच पाईक आहे.आणि हेच विचार आचरणात आणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसेच जिल्ह्यामध्ये जे जे लोक या विचारांशी एकनिष्ठ आहेत अशा आणि आमच्याशी बरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन सध्या देशामध्ये चालू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये मा.शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी राहून पक्ष बळकट करण्याचा मी प्रयत्न करेन.पक्ष कशा पद्धतीने वाढेल आणि पक्षाची वाढ कशाप्रकारे करता येईल याकडे लक्ष देऊन राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्याचा माझा प्रयत्न राहील.पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी मोठ्या प्रयत्नाने यशस्वी करून दाखवेन .आणि दिलेल्या जबाबदारीचे पूर्णतः पालन करीन.
यावेळी बोलताना बँक पॅंथरचे जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई म्हणाले की ,विनय कदम यांना मिळालेली संधी म्हणजे पुरोगामी विचार जिवंत ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची ही संधी आहे असे मी समजतो .अनेक वर्षाच्या संघर्षानंतर विनय कदम यांना ही मिळालेली मोठी संधी आहे. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम करत आलेलो आहे .आणि मला प्रत्येक वेळी त्यांची मार्गदर्शन लाभलेले आहे .आज देशाला आणि राज्याला अशा विचारांची गरज आहे.
या कामी मला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार सुप्रिया सुळे,आमदार जितेंद्र आव्हाड, व्ही. बी. पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले, आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि मिळालेल्या संधीचे सोने करीन.असे यावेळी सत्कार समारंभाच्या वेळी विनय कदम यांनी सांगितले . यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते ऍड. सुरेश कुराडे , मुद्रा एजन्सीचे अनंत पोतदार माजी नगरसेवक मा विजय सरदार जेष्ठ पत्रकार मा वसंत लिंगनूरकर रवींद्र सोळंकी (अण्णा) ,आनंदा सातपुते ,पी. डी. चौगले, रमेश जंगले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.