ई-कन्टेन्ट निर्मितीत आवाज व व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे : श्री. तुषार भद्रे कोल्हापूर(प्रतिनिधी): आजच्या बदलत्या जीवनशैलीत केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नसून चांगला माणूस असणे हेच सर्वांत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी व उच्चारशास्त्र तज्ज्ञ श्री. तुषार भद्रे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने पीएम-उषा योजनेंतर्गत विविध विद्याशाखांच्या अध्यापन व अध्ययनासाठी “इंटरॲक्टिव्ह ई-कन्टेन्ट विकसन” या विषयावर आयोजित दोन …