no images were found
स्क्रीनच्या पलीकडे: सोनी सब कलाकार सोशल मीडियातून चाहत्यांशी जवळीक साधताना
मुंबई, : आजच्या डिजिटल‑फर्स्ट जगात कलाकार आणि प्रेक्षक यांचं नातं फक्त टीव्ही स्क्रीनपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सोशल मीडिया ही अशी जागा बनली आहे जिथे कलाकार आपलं आयुष्याचे क्षण शेअर करतात, चाहत्यांशी थेट संवाद साधतात आणि त्यांच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळवतात. शूटिंगदरम्यानचे बिहाइंड‑द‑सीन्स क्षण, ट्रॅव्हल डायरी, इंटरॅक्टिव्ह कंटेंट आणि मनापासून केलेल्या गप्पा या सगळ्यामुळे कलाकारांना प्रेक्षकांशी खरी, मनापासूनची नाती बांधता आली आहेत. सोनी सबचे कलाकार गुलकी जोशी, करुणा पांडे, इकबाल खान, तोरल रसपुत्रा आणि मुस्कान बामने यांनी सांगितलं की डिजिटल स्पेस स्वीकारल्यामुळे त्यांना सर्जनशील समाधान मिळतंय आणि चाहत्यांशी नातं अधिक घट्ट होतंय.
गुलकी जोशी, जी ‘यादें’मध्ये डॉ. सृष्टीची भूमिका करते, म्हणाली, “सोशल मीडियाशी जोडलेली माझी एक आवडती आठवण म्हणजे मी माझ्या पेजवर छोटासा कॉन्टेस्ट घेतला होता जिथे चाहत्यांना माझ्याबद्दल प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. हे पाहून मन भरून आलं की त्यांनी माझ्या प्रवासाकडे किती बारकाईने लक्ष दिलंय! मी काही विजेत्यांना पर्सनलाइज्ड गिफ्ट्स, हाताने लिहिलेली पत्रं आणि त्यांना खरंच आवडतील अशा छोट्या गोष्टी पाठवल्या. त्यातून मिळालेलं प्रेम आणि आनंद जबरदस्त होतं. अशा क्षणांमुळे जाणवतं की सोशल मीडिया फक्त फोटो पोस्ट करण्याचं माध्यम नाही, तर खरं नातं बांधण्याचा सुंदर मार्ग आहे.”
करुणा पांडे, जी ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाची भूमिका करते, म्हणाली, “बहुतेक लोक मला स्क्रीनवर पुष्पा म्हणून ओळखतात, पण सोशल मीडियामुळे मला अभिनयापलीकडे माझ्या खर्या आवडी शेअर करण्याची संधी मिळाली. मला डान्स रील्स पोस्ट करणं खूप आवडतं कारण नृत्य मला खूप आनंद देतं आणि चाहत्यांशी क्रिएटिव्ह आणि स्पॉन्टेनियस पद्धतीने जोडता येतं. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्लॅटफॉर्मवरून प्राण्यांच्या कल्याणाबद्दल बोलणं. मी नियमितपणे प्राण्यांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्याशी दयाळूपणे आणि सन्मानाने वागण्याबद्दल पोस्ट करते आणि ज्या मुद्द्यांवर अधिक लक्ष आणि कृती हवी आहे त्याबद्दल जागरूकता निर्माण करते. जर एखाद्या पोस्टमुळे कुणी प्राण्यांबद्दल अधिक करुणामय झाला किंवा एखादी अर्थपूर्ण चर्चा सुरू झाली, तर मला वाटतं ते सार्थक आहे. माझ्यासाठी सोशल मीडिया फक्त मनोरंजन नाही, तर जागरूकता निर्माण करण्याचं, माझ्या मनापासूनच्या कारणांना पाठिंबा देण्याचं आणि लोकांशी खरं नातं जोडण्याचं शक्तिशाली माध्यम आहे.”
इकबाल खान, जो ‘यादें’मध्ये डॉ. देवची भूमिका करतो, म्हणाला, “मी कधीच सोशल मीडियाकडे नंबर वाढवण्याचं किंवा एंगेजमेंटच्या मागे धावण्याचं साधन म्हणून पाहिलं नाही. मी फक्त त्या क्षणी मला खरंच शेअर करावंसं वाटतं तेच पोस्ट करतो. माझ्यासाठी ही अशी जागा आहे जिथे लोकांना माझं वेगळं रूप पाहायला मिळतं. कधी एखादा वैयक्तिक विचार, कधी आयुष्याची झलक आणि अर्थातच माझ्या कामाबद्दल अपडेट्स इथे शेअर करतो. मला वाटतं खरी नाती तेव्हाच तयार होतात जेव्हा तुम्ही ऑथेंटिक राहता, आणि मी सोशल मीडियाकडे तसंच पाहतो.”
मुस्कान बामने, जी ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये शनायाची भूमिका करते, म्हणाली, “जर तुम्ही माझं सोशल मीडिया स्क्रोल केलंत तर दोन गोष्टी जास्त दिसतील – चंद्र आणि माझं कुटुंब! मी पूर्णपणे ‘सेलेनोफाइल’ आहे आणि सुंदर चंद्र दिसला की फोटो काढल्याशिवाय राहवत नाही. त्यात एक वेगळाच शांतपणा आहे. त्याच वेळी मला माझ्या कुटुंबासोबतचे छोटे क्षण शेअर करणं आवडतं कारण ते माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. मला वाटतं सोशल मीडिया तेव्हाच सर्वोत्तम असतं जेव्हा ते तुमचं खरं रूप दाखवतं तुमच्या आवडी, तुमचे प्रियजन आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टी. त्यामुळे ऑनलाइन कनेक्शन खरं वाटतं.”
तोरल रसपुत्रा, जी ‘हस्तिनापुर के वीर’मध्ये कुंतीची भूमिका करते, म्हणाली, “लोक मला बहुतेक वेळा कुंतीच्या राजेशाही पोशाखात पाहतात, पण सोशल मीडियामुळे मला फॅशनद्वारे माझं वेगळं रूप दाखवता येतं. मला खरंच आउटफिट रील्स बनवणं, स्टाईल्सवर प्रयोग करणं आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे लुक्स शेअर करणं आवडतं. लोक जेव्हा त्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया देतात, आउटफिट कुठून घेतलं विचारतात किंवा स्वतः तो लुक रिक्रिएट करतात, तेव्हा खूप छान वाटतं. मला वाटतं सोशल मीडिया फक्त काम प्रमोट करण्यासाठी नाही, तर तुमच्या आवडी शेअर करण्यासाठी आणि प्रेक्षकांशी खरं नातं जोडण्यासाठी आहे.”