Home Uncategorized धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !

6 second read
0
0
5

no images were found

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !

 *’…. अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती

 

मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’  हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे. हा निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि परकीय इस्लामी आक्रमकांनी अतिक्रमित केलेल्या मंदिरांच्या मुक्ती लढ्याचा भव्य विजय आहे. भोजशाळेच्या मुक्तीचा लढा आज यशस्वी झाला असला, तरी या संघर्षात मोठा सहभाग हा “भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे” प्रमुख श्री. नवलकिशोर शर्मा आणि हिंदु जनजागृती समिती यांचा होता. समिती या ऐतिहासिक निर्णयाचे सहर्ष स्वागत करते आणि *’…अब काशी-मथुरा बाकी हैं!’* ची संकल्प घोषणा करत आहे.

*हिंदु जनजागृती समितिचे आंदोलन आणि हिंदु अधिवेशनाची फलश्रुती !* 

धार येथील भोजशाळेच्या मुक्तीसाठी हिंदु जनजागृती समितीने केवळ रस्त्यावर  आंदोलने केली नाहीत, तर राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनजागृती केली. गोवा येथे होणाऱ्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) या राष्ट्रीय व्यासपीठावरून दरवर्षी या संदर्भात कायदेशीर आणि धोरणात्मक ठराव मंजूर करून लढ्याची दिशा ठरवली. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडे याविषयी सातत्याने दाद मागितली होती. आज न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावनांना आणि समितीच्या प्रदीर्घ आंदोलनाला न्याय मिळाला आहे.

*आक्रमकांचे अतिक्रमण हटवून काशी-मथुरेचा लढा निरंतर राहणार!*

या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी स्पष्ट केले की, भारतातील हिंदूंची केवळ एक-दोन देवस्थाने आक्रमित झालेली नाहीत. परकीय आक्रमकांनी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या सहिष्णुतेचा फायदा घेऊन हजारो मंदिरांवर अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आणि त्यावर स्वतःचा खोटा अधिकार सांगितला. अयोध्या आणि धार (भोजशाळा) येथील निकालांनी हे सिद्ध केले आहे की, असत्याचा बुरखा फार काळ टिकत नाही. आता वेळ आली आहे की काशीच्या ज्ञानवापीपासून ते मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंतची सर्व आक्रमित क्षेत्रे मुक्त झाली पाहिजेत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पी .एम . सुर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार – मंत्री हसन मुश्रीफ

पी .एम . सुर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार – मंत्री हसन मुश्रीफ क…