no images were found
अदाणी ग्रुपने बांधलेल्या गंगा एक्सप्रेसवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले
यूपीमधील सर्वात मोठा ग्रीनफील्ड प्रकल्प 3.5 वर्षांपेक्षा कमी वेळात पूर्ण झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरदोई येथून 594 किलोमीटर लांबीच्या गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असून, तो 3.5 वर्षांपेक्षा कमी वेळात पूर्ण करण्यात आला आहे. हा एक्सप्रेसवे पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठला पूर्व उत्तर प्रदेशातील प्रयागराजशी जोडतो, ज्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
अनेक वर्षांपासून पूर्व उत्तर प्रदेशात लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता असूनही अपेक्षित विकास झाला नव्हता. गंगा एक्सप्रेसवे या भागातील लपलेली आर्थिक क्षमता उघड करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल. हा प्रकल्प चांगली कनेक्टिव्हिटी, कमी प्रवास अंतर आणि राज्याच्या विकास कॉरिडॉरशी मजबूत कनेक्टिव्हिटी देऊन पूर्व उत्तर प्रदेशला नवी आर्थिक दिशा देईल.
गंगा एक्सप्रेसवे सुरू झाल्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 11 तासांवरून कमी होऊन जवळपास 6 तासांपर्यंत येईल. त्यामुळे व्यवसाय, लॉजिस्टिक्स, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यटन क्षेत्रांना मोठा फायदा होईल. रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यासाठी या एक्सप्रेसवेवर एआय- सक्षम कॅमेरा सिस्टम बसवण्यात आले आहेत, जे अपघात टाळण्यासाठी आधीच सूचना देतील.
या प्रकल्पांतर्गत शाहजहांपूर जिल्ह्यात 3.5 किमी लांबीची आपत्कालीन लँडिंग सुविधा उभारण्यात आली आहे, ज्यामुळे भारतीय वायुसेनेची विमाने आपत्कालीन परिस्थितीत येथे उतरू शकतील आणि या महत्त्वाच्या कॉरिडॉरची क्षमता आणखी मजबूत होईल.
12 जिल्ह्यांतून जाणारा हा सहा लेनचा एक्सप्रेसवे भविष्यात आठ लेनपर्यंत वाढवता येईल. यामुळे बाजारपेठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक केंद्रे आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सेवा लवकर मिळतील, तर व्यवसाय आणि उद्योगांना वेगवान कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल.
अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) चा रोड्स व्यवसाय असलेल्या, अदाणी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडने या प्रकल्पातील 464 किमी म्हणजेच एकूण मार्गाच्या सुमारे 80% भागाचा विकास केला. बांधकामादरम्यान या प्रकल्पावर 12,000 पेक्षा जास्त कामगार कार्यरत होते. उर्वरित भागाचे बांधकाम आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने केले आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या मते, हा एक्सप्रेसवे दरवर्षी सुमारे 25,000 ते 30,000 कोटींची लॉजिस्टिक्स बचत करेल, पुढील 10 वर्षांत सुमारे 3 लाख रोजगार निर्माण करेल आणि राज्याच्या जीडीपीमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त योगदान देईल. तसेच, यामुळे मालवाहतुकीचा वेग वाढवून अनेक क्षेत्रांतील मालसाठा ठेवण्याचा खर्च कमी होण्यास मदत होईल.
या मुख्य मार्गामुळे कृषी उत्पादने आणि इतर वस्तूंची जलद वाहतूक सुनिश्चित होऊन व्यापार अधिक मजबूत होईल. बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आणि चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी आणि लहान उद्योगांना फायदा होईल.
गंगा एक्सप्रेसवेमुळे उत्तर प्रदेशातील औद्योगिक आणि कृषी कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, ज्यामुळे सुमारे 8 कोटी लोकांना फायदा होईल. तसेच, यामुळे प्रयागराज आणि वाराणसीसारख्या धार्मिक स्थळांना भेट देणे सोपे होईल, ज्यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल.