no images were found
छोरियाँ चली गाँव’मध्ये अनीता हसानंदानी आणि डॉली जावेदचे अतूट नाते झळकतेय!
‘छोरियाँ चली गाँव’च्या स्पर्धकांमध्ये अनीता हसानंदानी, ऐश्वर्या खरे, अंजुम फकीह, कृष्णा श्रॉफ, डॉली जावेद, एरिका पॅकार्ड, रमीत संधू, सुमुखी सुरेश, सुरभी आणि समृद्धी मेहरा यांचा समावेश आहे. गावातल्या कामांमध्ये, नाट्यात आणि भावनिक चढउतारांमध्ये सगळ्यांनी धैर्य, हसण्याची उमेद आणि अढळ निर्धार दाखवला आहे. मात्र, प्रत्येक दिवसागणिक एक नाते अधिकाधिक घट्ट होत गेलेले आणि विशेष ठरलेले आहे आणि ते म्हणजे अनीता हसानंदानी आणि डॉली जावेद यांच्यातील नाते.
सुरुवातीपासूनच, जेव्हा अनीता आणि डॉली यांना एकाच घरात ठेवण्यात आले, तेव्हा फक्त एकाच जागेत राहण्याचा विषय वाटणारी गोष्ट हळूहळू अधिक अर्थपूर्ण नात्यात रूपांतरित झाली. घरकाम वाटून घेण्यापासून ते गप्पागोष्टी करण्यापर्यंत, हसण्यातून आणि एकमेकांच्या अनुभवांतून शिकण्यातून त्यांनी एक वेगळाच प्रवास सुरू केला. हळूहळू त्या एकमेकींचा आधारस्तंभ बनल्या. या नात्याची कसोटी काही अतिशय कठीण प्रसंगांमध्ये लागली आणि तेव्हा ती सिद्धही झाली – विशेषत: एलिमिनेशनच्यावेळी दोघींनी एकमेकींना वाचवण्यासाठी पुढे येऊन साथ दिली.
अनीतासोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना डॉली जावेद म्हणाली, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, कारण मी तिच्यासोबत राहतेय, ती माझी मैत्रीण तर आहेच पण ती मला गोष्टी समजून घेण्यात मदतही करते, आणि ती खूप प्रामाणिक आहे. मला ती खूप आवडते.”
डॉलीशी बोलताना अनीता हसानंदानी म्हणाली, “डॉली, तुझ्या कुटुंबाचा तुझ्यावर खूप अभिमान असणार आहे.”
पहिल्या एविक्शनदरम्यान, जेव्हा तिने डॉलीला घरात ठेवण्यासाठी मत दिले, तेव्हा अनीता म्हणाली, “डॉली इथे असणे माझ्यासाठी या घरात एक बळ ठरेल आणि मला असेही वाटते की ती एक खूप चांगली परफॉर्मर आहे.”
अनीता आणि डॉलीचे नाते ‘छोरियाँ चली गाँव’चे एक हृदयस्पर्शी आकर्षण बनले आहे. यातून या गोष्टीची जाणीव होते की स्पर्धेच्या वातावरणातसुद्धा आपण निर्माण केलेली नातीच लक्षात राहतात.