Home शैक्षणिक शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना उराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये ! – सुराज्य अभियानाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन 

शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना उराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये ! – सुराज्य अभियानाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन 

11 second read
0
0
17

no images were found

 

शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना उराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये ! – सुराज्य अभियानाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- नवीन शिक्षण वर्ष चालू झाले की पालक विद्यार्थ्यांची पुस्तके, तसेच लागणारे अन्य साहित्य खरदीची घाई असते. या संदर्भात असे निदर्शनास आले आहे की काही शाळेच्या व्यवस्थापन समिती कडून पालकांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, तसेच गणवेश हा ठराविक विक्रेत्यांकडून घेण्याची सक्ती करण्यात येते. तरी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना शाळेच्या व्यवस्थापन समिती कडून पालक विद्यार्थी यांना उराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास  सक्ती करण्यात येऊ नये, तसेच असे काही होताना आढळल्यास त्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना देण्यात आले. दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात परिपत्रक काढून शाळांना सूचना देऊ, तसेच प्रसिद्धी माध्यमांमधूनही सुचित करू, असे सांगितले. 

 

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप आणि श्री. विकास जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. कैलास दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. प्रीतम पवार उपस्थित होते.

 

** निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या*

 

१. छत्रपती संभाजीनगर, जळगावप्रमाणे जिल्हा कार्यालयातून आदेश काढावेत.

 

२. शिक्षण खात्याच्या माध्यमातून प्रत्येक शाळा शासन निर्णयाचे पालन करत आहे ना ? या बाबत तपासणी करावी, पालन करत नसल्यास त्यांना सूचना पाठवाव्यात. तरीही कृती होत नसल्यास दंडात्मक कार्यवाही करावी.

 

३. पालकांच्या माहितीसाठी हा आदेश शाळेच्या फलकावर लावण्यासाठी सूचना द्याव्यात आणि समाजात या विषयी जागृती ही करावी.

 

४. असे प्रसंग आढळल्यास पालकांना थेट शिक्षण अधिकारी / शिक्षण खात्याकडे तकरार करण्यासाठी ‘हेल्पलाईन३ क्रमांक चालू करावा आणि त्या विषयी प्रत्येक शाळेतून पत्रक लावावेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम कोल्ह…