Home सामाजिक कोल्हापूर जिल्ह्यात शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला!

कोल्हापूर जिल्ह्यात शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला!

0 second read
0
0
40

no images were found

कोल्हापूर जिल्ह्यात शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला!

कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत मूल्यमापन झालेल्या गावांचा निकाल फुटल्याचे गुरुवारी उघड झाले. शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या समितीने निकाल जाहीर करणे बंधनकारक असताना हातकणंगले तालुक्यात परस्पर निकाल जाहीर झाला आहे. यामुळे नियमबाह्यपणे निकाल कसा जाहीर झाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त आहे.गावातील स्वच्छता, पारदर्शक कारभार, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण रक्षणासाठीचे उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर या निकषावर गावांचे मूल्यमापन होते. योजनेची व्यापक प्रसिद्धी, मूल्यमापन, तालुका, जिल्हा तपासणी समिती स्थापन करणे, तालुका तपासणी समिती करणे आदी टप्प्यात तपासणीची प्रक्रिया राबवली जाते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…     जागतिक पर्यावरण …