जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, सादरीकरण महत्त्वाचे: डॉ. बबन जोगदंड कोल्हापूर(प्रतिनिधी): आजचे हे जग निव्वळ स्पर्धेचे नसून ते संवाद कौशल्य, सादरीकरण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनविषयक ज्ञान मिळविण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ते आत्मसात केले पाहिजे. सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कष्ट केल्यास यशप्राप्ती शक्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी …