गुन्हेगारांच्या राजकीय आश्रयदात्यांना हद्दपार करण्याची गरज-हेमंत पाटील पुणे, :- कायदाव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडल्या आहेत.परभणीतील आंदोलनकर्ता सोमनाथ सुर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत झालेला दुदैवी मृत्यू असो अथवा बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या, या दोन्ही घटना राज्याला हादरवणाऱ्या ठरल्या आहेत. पुढारलेला महाराष्ट्र गुन्हेगारीत बिहारला देखील मागे टाकणार का? असा सवाल गुरुवारी (ता.१९) …