मार्च 2026 पूर्वी देशातून डाव्या विचारसरणीचा अतिरेक पूर्णपणे संपुष्टात येईल: अमित शहा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत नक्षलविरोधी कारवायांचा आढावा घेताना आणि त्याच्या सीमेवर असलेल्या राज्यांना मार्च 2026 पूर्वी देशातून डाव्या विचारसरणीचा अतिरेक पूर्णपणे संपुष्टात येईल, असे स्पष्ट केले. तसंच, शाह यांनी डाव्या विचारसरणीच्या अतिरेकात सहभागी असलेल्या तरुणांना हिंसाचारापासून दूर राहून विकासाच्या महायज्ञात सहभागी होण्याचं आवाहन केलं. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली, निर्दयी दृष्टिकोनाने डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांची संपूर्ण परिसंस्था नष्टकरण्याचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. शहा यांच्या अचूक रणनीतीनुसार, गेल्या 8 महिन्यांत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार कारवाया करण्यात आल्या, ज्याचा परिणाम म्हणून चकमकीत 147 नक्षलवादी मारले गेले, 631 आत्मसमर्पण केले गेले आणि 723 जणांना अटक करण्यात आली. डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या भागात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या नवीन छावण्या उभारणे, त्यांची तैनाती आणि त्यांच्याकडून विकासकामांवर देखरेख यामुळे ही लढत आता निर्णायक टप्प्यात असल्याचे दिसून येते. अनेक दशकांपासून देशाच्या विकासाला बाधक ठरलेल्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकात सहभागी असलेल्या तरुणांना आत्मसमर्पण करण्याची संधी देणे हे शहा यांची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे डाव्या अतिरेकी विचारसरणीऐवजी विकासावरचा लोकांचा विश्वास वाढला आहे. अमित शाह यांच्या धोरणांतर्गत, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित भागात विकासाचा अभाव आणि सुरक्षेतील अंतर भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध …