Home Uncategorized कृत्रिम बुद्धीमतेमुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रचंड गती अतुल कहाते यांचे प्रतिपादन:विद्यापीठात मुल्याधिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन

कृत्रिम बुद्धीमतेमुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रचंड गती अतुल कहाते यांचे प्रतिपादन:विद्यापीठात मुल्याधिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन

2 second read
0
0
6

no images were found

कृत्रिम बुद्धीमतेमुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रचंड गती
अतुल कहाते यांचे प्रतिपादन:विद्यापीठात मुल्याधिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन
कोल्हापूर(प्रतिनिधी): गेल्या साठ वर्षातील प्रगती कृत्रिम बुद्धीमतेमुळे गेल्या दोन वर्षात तंत्रज्ञानातील प्रगतीला प्रचंड गती मिळाली आहे. नोकऱ्या जाणार याची भीती सोडून ‘ए आय’ बाबत जागरुकता वाढवून त्याची कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक व माहिती तंत्रज्ञान तज्ञ अतुल कहाते यांनी केले.
श्री. कहाते पुढे म्हणाले की, विषयांचे मुलभूत ज्ञान व कौशल्ये असावेच लागेल परंतु, कार्यकलापाचे सुलभीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता क्रांतिकारक भूमिका बजावेल. ‘ए आय’ सोबत काम करण्याची सवय करून घेतली पाहिजे. ‘ए आय’ ची क्रांती त्सुनामी सारखी आली आहे, त्यावर स्वार होणारे टिकून राहतील, विरोध करणारे बाहेर फेकले जातील.
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्यावतीने आयोजित केलेल्या “बिझनेस अॅप्लिकेशन ऑफ ‌‍‍आर्टिफिशियल इंटलीजन्स” या विषयावरील पाच दिवशीय मुल्याधिक अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन हे होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ज्ञान आणि कौशल्यासह विद्यार्थी जगातील प्रश्नांना सामोरे जावेत यासाठी या अभ्यासक्रमाचे आयोजन पीएम – उषा (सॉफ्ट कॉम्पोनंट) अंतर्गत करण्यात आल्याचे प्रा. महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. दोन श्रेयांकाचा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासातून रोजगारभिमुखता वृद्धीसाठी तयार करण्यात आला आहे. व्यवसायातील विविध कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे कौशल्य विद्यार्थी यातून शिकणार आहेत.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. केदार मारुलकर यांनी केले तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले.
या कोर्सअंतर्गत पुढील पाच दिवसात नामवंत तज्ञांची ३० व्याखाने होणार आहेत.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

 गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे…