Home राजकीय मोदी सरकारचा निर्धार –जम्मू काश्मीरमधील दहशतवाद संपवायचाच : अमित शाह

मोदी सरकारचा निर्धार –जम्मू काश्मीरमधील दहशतवाद संपवायचाच : अमित शाह

5 min read
0
0
104

no images were found

मोदी सरकारचा निर्धारजम्मू काश्मीरमधील दहशतवाद संपवायचाच : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी नुकतेच राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर‘ आणि ‘ऑपरेशन महादेव‘ यांच्या यशस्वीतेवर सविस्तर चर्चा केलीया प्रसंगी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताने ज्या दृढनिश्चयाने आणि निर्णायकतेने दहशतवादाला प्रत्युत्तर दिलेते संपूर्ण जगासाठी एक आदर्श ठरले आहेदहशतवादाच्या मुळावर घाव घालण्यासाठी आणि काश्मीरसाठी स्वतःचे प्राण पणाला लावणारे शाह यांनी या वेळी स्पष्ट इशारा दिला की काँग्रेसने पाकिस्तानला पीओके दिले होतेपण भाजप सरकार ते परत आणणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळे ‘ऑपरेशन सिंदूर‘ शक्य झालेया ऐतिहासिक मोहिमेद्वारे भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या भूमीवर असलेल्या दहशतवादी तळांना अचूकपणे लक्ष्य करत नष्ट केलेपाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम अर्ध्या तासाच्या आत उद्ध्वस्त करण्यात आली आणि जगाला हा   स्पष्ट संदेश दिला की नवीन भारत आता डोझियर नव्हे तर क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर देतोहा केवळ लष्करी शक्तीचा प्रात्यक्षिक नव्हतातर भारताच्या सार्वभौमत्व आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड  करण्याचा इशाराही होता.

लष्करी कारवाईबरोबरच राजकीय पातळीवरही कठोर निर्णय घेण्यात आलेकॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत एकतर्फी सिंधू जल करार थांबवणेअटारी येथील एकात्मिक तपासणी चौकी बंद करणे आणि पाकिस्तानच्या राजनयिकांची संख्या कमी करणे असे निर्णय घेतले गेलेया निर्णयांमुळे पाकिस्तानला हे स्पष्ट झाले की भारत आता प्रत्येक पातळीवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी सज्ज आहे.

ऑपरेशन महादेवने भारताची रणनीतिक क्षमता आणि राजकीय दृढता यांचे दुसरे परिमाण जगासमोर मांडलेया मोहिमेंतर्गत पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी – सुलेमानअफगान आणि जिब्रान – यांना सुरक्षा दलांनी अचूक कारवाईत ठार केलेया संपूर्ण मोहिमेचे यश अमित शाह यांच्या दूरदृष्टीपूर्ण रणनीतीचे आणि जवानांच्या अपार शौर्याचे फलित होते. 22 मे ते 22 जुलैपर्यंत सातत्यपूर्ण देखरेख आणि गुप्तचर प्रयत्नांनंतर 28 जुलैला भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांचा खातमा केलात्याचबरोबर जगासमोर हेही स्पष्ट झाले की कोणताही हिंदू दहशतवादी असू शकत नाही.

या मोहिमांनी हे स्पष्ट केले की नवीन भारत केवळ प्रतिसाद देणारा नाहीतर आक्रमक भूमिका स्वीकारणारा देश बनला आहेपाकिस्तानला त्यांच्या डीजीएमओच्या माध्यमातून युद्धविरामाची विनंती करावी लागलीजे हे सिद्ध करते की भारताच्या रणनीतीने त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्थेला हादरवून टाकले आहे.

दहशतवादमुक्त भारत घडवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राजकारणातील आधुनिक चाणक्य अमित शाह यांच्या नीतीमुळे आज काश्मीरची स्थिती पूर्णतः बदलली आहेजिथे कधी दहशतवाद्यांचा आणि फुटीरतावाद्यांचा प्रभाव होतातिथे आज दहशतवाद 70% पर्यंत कमी झाला आहेपहिल्यांदाच दहशतवादी संघटनांमध्ये कोणताही काश्मिरी तरुण सहभागी होत नाहीदगडफेक आणि संप यांची आठवणही आता इतिहासजमा झाली आहेपंचायत निवडणुकीत 98.03% मतदान झाले असूनहा लोकशाही परिवर्तनाचा ठोस पुरावा आहेजमातइस्लामी आणि हुर्रियतसारख्या संघटनांवर बंदीदहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करणे आणि परदेशी निधीवर नियंत्रण ठेवणे यामुळे दहशतवादाच्या मुळांवर घाव घालण्यात आले आहेआता काश्मीरमध्ये शांततेची आणि विकासाची नवी पहाट उगवताना दिसत आहे.

जेव्हा स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाचा इतिहास लिहिला जाईलतेव्हा हा काळ सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईलया इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृढ इच्छाशक्ती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दूरदृष्टीपूर्ण रणनीती सदैव स्मरणात राहीलअसे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही की भारताच्या आत्मविश्वासराष्ट्रगौरव आणि दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढाईचे प्रतीक ठरलेली ऑपरेशन सिंदूर‘ आणि ‘ऑपरेशन महादेव‘ ही केवळ लष्करी मोहीम नव्हेतर दहशतवादी हल्ल्यांना दिलेले सर्वात अचूककठोर आणि तात्काळ उत्तर आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…