कोल्हापूर : रेशीम उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. हा उद्योग करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करुन या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांना सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. आरळे येथील रुक्मिणी दत्त रेशीम प्रक्रिया उद्योग केंद्र तसेच विविध उद्योग समुहांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्य रेशीम सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आदिकराव जाधव, रेशीम …